ताज्या घडामोडी

कर्तृत्वसंपन्न वारसा…डॉ. विश्वजीत कदम

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

कर्तृत्वसंपन्न वारसा…डॉ. विश्वजीत कदम

Download Aadvaith Global APP

माजी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून २०१८ साली बिनविरोध निवड करीत महाराष्ट्रात एक राजकीय इतिहास निर्माण केला. लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासकामांना गती देत कृतीशील लोकप्रतिनिधी असा नावलौकिक मिळविला आणि २०१९ पुन्हा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर वनला विश्वजित निवडणूक लढवून विजयी झाले. मा. प्रियांका गांधींनी आपल्या फेसबुक पेजवर विश्वजित यांचे कौतुक केले. मा. राहुलजी गांधी यांच्यासमवेतचा फोटो शेअर करुन विक्रमी मताधिक्याची दिल्ली दरबारी दखल घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी दिलेली ऑफर नाकारून काँग्रेसच्या वाघाने १ लाख ६२ हजार ५२१ इतके महाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रमी मताधिक्य घेतले होते. राजकारणाचा आणि समाजकारणाचा आपल्या वडिलांकडून लाभलेला समृद्ध आणि संपन्न वारसा समर्थपणे पुढे चालवित आहेत.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पलूस-कडेगावच्या राजकारण आणि समाजकारणात प्रवेश केला. डॉ. पतंगरावजी कदम साहेब आणि आ. मोहनदादा कदम, मातोश्री श्रीमती विजयमाला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित कदम यांनी सदैव सामान्य माणसांच्या मदतीसाठी काम केले. पलूस-कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची शेती करता यावी आणि त्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने २००३ साली हिंगणगाव खुर्द येथे ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ. आमदार मोहनराव कदम यांच्या नावाने ‘लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय’ सुरू केले. २००६ साली गर्भात खुडल्या जाणाऱ्या सावित्रीच्या लेकींना वाचविण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात ‘मुलगी वाचवा’ अभियान सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले.

या कामाची जाणकारांनी महाराष्ट्रभर दखल घेतली. २००७ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. त्याकाळात राज्यभर दौरे करून पक्ष बांधणीसाठी मोलाचे योगदान दिले. २००८ साली युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले. डॉ. विश्वजित कदम साहेब यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली असताना देखील त्यांनी विनम्रपणे नाकारत पलूस-कडेगाव मतदारसंघातील सामान्य माणसांसाठी सेवेतच राहण्याचे ठरविले.

अगदी कोवळ्या वयात भारती विद्यापीठाच्या पालकत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आणि काळाची पावले ओळखत आपण ती समर्थपणे पुढे नेत आहात. वाटचाल करीत असताना आपले वडील भारती विद्यापीठाचे संस्थापक – कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचा प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी त्यांना वाटणारी कणव, आव्हानांना धीराने सामोरे जाण्याची वृत्ती आणि मातोश्रींची शिस्तप्रियता, माणसे जोडण्याची वृत्ती, कलात्मकदृष्टी यांचे बाळकडू आपल्याला संस्कार रूपाने लाभले.

डॉ. पतंगरावजी कदम साहेब आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली. संवेदनशील आणि लोकांच्या व्यथा वेदना जाणणारा नेता कसा असावा, याचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्राला घालून दिला. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 पृथ्वीराज चव्हाण,

माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App